मुख्य सामग्रीवर वगळा

Tanu Weds Manu Return


तनु वेड्स मनु रिटर्न



सध्या जुनंच भांडवल वापरुन नव्याने नफा कमविण्याचा उद्योग चालू आहे. "सेकडं पार्ट" हा हॉलीवूडचा यशस्वी फॉर्म्युला हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचा नवा ट्रेन्ड आहे. हिन्दीत म्हण आहे "सब्र का फल मीठा होता है." त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे "सेकडं पार्ट"च्या नावाने अनेकानेक अत्याचार सहन केल्यावर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम कलाविष्कार पहायला मिळाला तो म्हणजे तनु वेड्स मनु रिटर्न.

"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू १) -  ब्रॅन्ड सेट झालेला असतो, नव्याने मार्केटींग करण्याची कसरत तुलनेने थोडी कमी करावी लागते. फिल्ममेकर्स ह्या गोष्टीचा पुरेपुर फायदा घेत, थातुरमातुर मुलामा चढवलेली जुनीच गोष्ट प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचे उद्योग करताना सध्या दिसून येत आहेत.
"सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २)  - सिनेमा हे कथा सांगण्याच एक माध्यम आहे, ज्यात प्रात्र उभी करावी लागतात त्यांच कथेतील वागणं जस्टीफाय होण्याकरता त्या पात्राचे स्वभावविषेश, पार्श्वभूमी ह्यात सिनेमाचा जो वेळ जातो नेमका तोच वेळ ह्या"सेकडं पार्ट" मध्ये शिल्लकीत असतो. त्याचा फायदा उचलून उत्तम कथानक देण्याच्या भानगडीत कोणी फिल्ममेकर्सच्या नाही आहे.

अश्यातच आनंद एल राज नावाचा कोणी अवलिया तनु वेड्स मनु रिटर्न घेऊन येतो. "सेकडं पार्ट"ची जमेची बाजू २) चा पुरेपुर फायदा उचलत एक अत्यंत वेगवान नि दर्जेदार कथानक आपल्याला पाहायला मिळंत. जिथे ज्या लग्नसमारंभात सिनेमा चार वर्षापूर्वी संपलेला अगदी त्या तिथूनच रिटर्न्स सुरु होतो. मोठ्यामेहनतीने अरेन्ज मॅरेजच रुपांतर लव्ह मॅरेज मध्ये करुन तनु-मनु हॅप्पी एन्डिग नोट वर संपलेल्या सिनेमाचे हिरोईन-हिरो. पुढची जेमतेम चार वर्ष संसाराची सहन करुन (लंडन मध्ये) पुन्हा भारतात परतात. त्यांच्या ह्या नव्या भारत सफारीने धमाल उडवून दिली आहे. हिरोईन-हिरोच नाही तर इतर सर्वच पात्र आयुष्याच्या ज्या वळणावर उभे आहेत तेथे त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचे परिणाम हे अप्रतिमरित्या उतरलेत. सिनेमाचा वास्तव जिवनाशी काही संबंध नसतो ह्या ही रुढीला पूर्ण फाटा देत प्रत्येक पात्र समोर येतं ते आपलं वाटू लागतं. व्हॉट्स अप वर कमेन्ट्चा चूकीचा अर्थ काढून पप्पीभैया घोड्चूक करुन बसतो. मनुला त्याचे वडील डायवोर्स पासून परावृत्त करण्याच्या मागे असताना स्व:त मात्र बायकोच्या कटकटीने वैतागून संयम गमावून बसतात, चारदा दीदी म्हणून झाल्यावरही तनुच्या प्रेमात पडणारा भाडेकरु, सगळ्यांचा स्वभाव काळाशी सुसंगत असल्याने आपल्याला सिनेमाशी रिलेट करणं सोप होऊन जातं. आणि हो कानपूर, पंजाब चे बारकावे मागील भागात ज्यासुंदर रितीने टिपलेले त्याचं नेक्स्ट व्हर्जन म्हणजे हरियाणा.

हिरो-हिरोईन हा प्रचलित शब्द सोडून हिरोईन-हिरो लिहण्याची दोन कारणे १) - संपूर्ण कथेत वरचढ असणारी तनु.
२) - तनु म्हणुन असणारी कंगणा, ह्या ही वर्षीचा नॅशनल अ‍ॅवार्ड मिळण्याची पुरेपुर संधी. संधी जी कंगणाने अतिशय महेनतीने निर्माण केली आहे. मिळालेल्या उत्तम भुमिकेचं तिने आपल्या अप्रतिम अभिनयाने खरचं सोनं केलं. रस्त्याने सहजच फिरताना समोरुन चाललेल्या लग्नाच्या मिरवणूकित मनसोक्त नि बिनधास्तपणे नाचून वरवर जरी जूनी तनु नि तिचा बिनधास्तपणाचा आव आणताना मात्र काळाच्या ओघात हळवी झालेली तनु निव्वळ अप्रतिम.  हरियाणवी टोन, अ‍ॅथलिटचा पुरुषी ढंग मिथुनदा च्या भाषेत क्या बात! क्या बात!! क्या बात!!!

सशक्त, वेगवान पटकथा सिनेमाच्या इतर तांत्रिक बाबींकडे पहायला वेळच देत नाही. एडिटिंग जबरदस्त, लोकेशन्स्, कॉस्च्युम डि़झाइनिंग रोचक आहेतच पण डबल रोल कसा असावा नि तो कसा निभवावा याचे नवीन आयाम उभे केलेत. कथा, पटकथा, संवाद नि व्यक्तिरेखा सर्वच बाबींत हा चित्रपट मैलाचा दगड ठरला आहे. आनंद एल राज हे नाव पुरेसं असणार आहे पुढील चित्रपट पाहण्यासाठी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बाबू बैन्ड बाजा

बाबू बैन्ड बाजा पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. बाब्यासुद्धा बाब्ची आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

Khwada ख्वाडा

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब,  गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात. भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांना...

सैराट... Sairat

हलका आहार... नि  जड आहार... सैराट पचायला थोडा जड गेला... जवळ-जवळ चार-एक दिवस गेले. दो दो शक़्लें दिखती हैं इस बहके से आईने में मेरे साथ चला आया है आपका इक सौदाई भी ख़ामोशी का हासिल भी इक लम्बी सी ख़ामोशी है उन की बात सुनी भी हमने अपनी बात सुनाई भी... हे नागराजंच १४ एप्रिलचं पोस्ट... हेच सैराट सिनेमात उतरलं आहे. नागराज ने पिटातल्या प्रेक्षकांचही ऐकलंय आणि स्व:तचही सांगितलं आहे. सिनेमा बनविण्याची व पाहण्याची कला ढोबळ पध्दतीने दोन प्रकारात विभागला गेली, कर्मशिअल आणि आर्ट. नंतर बर्याच कालावधी पर्यंत प्रेक्षकही ह्या अलिखित पध्दतित विभागले गेले. सैराट ने सर्व बांध मोडीत काढत कर्मशिअल आणि आर्ट एकत्र आणलय बघुया सर्वांना आवडतय का... जर हे खरचं सैराट चाललं तर येणार्‍या दिवसांत सिनेमा आणखी सशक्त होईल. फर्स्ट हाफ... एव्हडा सुंदर आहे कि विचारता सोय नाही. हिन्दी सिनेमावाले निर्सगाचं मनोवेधक रुप शोधायला पार स्विजरलैंडला जायचे... पण सैराट तर हॉलिवूडवाली दृष्य मराठीत आणि ते ही महाराष्ट्रातील गाव-खेड्यांतील वेडं लावणारी दृष्य आपल्यासमोर घेऊन येतो. एकाच सिनेमात किती सुंदर गोष्टींचा म...