दिल धडकने दो
वन लाईन स्टोरी फॅमिली मॅटर. तर एक उच्चभ्रू कुटुंब मेहरा. नवरा बायको नि त्यांची दोन मुलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या. प्रत्येकांच वेगळंच गाणं चाललय. कुणी (आनिल कपूर) बिझनेस मध्ये लयाला जाताना स्व: टिकवण्याच्या तयारीत तर कोणी (प्रियंका चोपडा) बिझनेस मधे नाव कमावून स्वः अजूनही हरवलेलाच, सुखाचं आयुष्यही शोषिता प्रमाणे जगणारी (शेफाली शहा), स्वः शोधावा अशी वेळच न आलेला (रणवीर सिंग), पुरोगामी असण्याची झूल मिरवणारा जावई (राहूल बोस), प्रक्टिकल (फरहान अख्तर), अजून एक प्रक्टिकल (अनुश्का शर्मा) ह्या सगळ्यांचा जीवनाचा कोलाज व्यवस्थितपणे आपल्या समोर येतो.
हिन्दी सिनेमा वेगळ्या वळणावर जाऊ पहातोय त्यांची एक (पुसटशी का होईना) झलक ह्यात दिसते. आता पर्यंत हिरो हिरोईन यांची प्रेम प्रकरणं, त्रिकोण - चौकोण नुकतिच कुठे याची पुढची पायरी म्हणून लग्नानंतरचं आयुष्य इथवर गाडी आलेली तर ह्यात ती अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे.
संपूर्ण पणे पांढर किंवा काळं असं काही नसतं ना आयुष्य... प्रत्येकांत ग्रे शेड्स असतातच ना... ह्या ग्रे शेड्स खुबीने दाखवण्याचं काम बर्याचदा लो बजेट आर्ट फिल्मस् उत्तम करतात. तेच इथे भव्य दिव्य पणे पूर्ण कर्मशियल सिनेमा करु पाहतो, पण ही रियालिटी नि रियल माणसं काही ह्या कर्मशियल सिनेमाला झेपत नाहीत. शेवटाकडे जाता जाता सगळंच कसं फिल्मी होऊन जातं. संगीत काही जमलं नाही एकही गाणं थियेटर मधून बाहेर पडल्यावर लक्षात राहत नाही. सिनेमॅटोग्राफी ही यथा तथाच. आर्ट/कर्मशियल मिश्रण काही एकजीव होत नाही रिमा काग्ती नि झोया अख्तर द्वयीकडून जे अपेक्षीत असं होतं ते काही गवसतं नाही. एवढं भव्य क्रू़झ नि त्यातून विदेश पर्यटन पण कुठेच ती भव्यता टिपली गेली नाही. ज्या व्यक्तिरेखा अस्सल म्हणून बारकाव्यांसहित सुरवातीला उभ्या राहतात... क्षणात फिल्मी पध्दतीने वागू लागतात. ना धड हे ना धड ते.
त्यातूनही काही सीन्स् अगदी जमून आलेत, नाविन्य ही आहेच थोड्सं. अभिनयात तर चढाओढच... त्यातूनही लक्षात राहते प्रियंका... (आयेशा मेहरा) मूलगी असण्याचं मोल प्रत्येक ट्प्प्यावर चुकवणारी त्यातून आलेला समंजसपणा... परिस्थितीशरण राहणं ते तो बुजरेपणा झट्कून स्वतःहा साठी जगणं ह्यात अचानक नि तीव्र बदल न होता तो ज्या हळुवार पणे भुतकाळाशी सुसंगत होतो ... हे अगदी उत्तम साकारलं आहे.
एकूणच भारतीय समाजाचं दुट्प्पीपण व्यवस्थित पणे समोर येतं सिनेमातून. एकदा पहावाचं जरुर... टिकावू नाही आहे पण टाकावू ही नक्कीच नाही.
वन लाईन स्टोरी फॅमिली मॅटर. तर एक उच्चभ्रू कुटुंब मेहरा. नवरा बायको नि त्यांची दोन मुलं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या. प्रत्येकांच वेगळंच गाणं चाललय. कुणी (आनिल कपूर) बिझनेस मध्ये लयाला जाताना स्व: टिकवण्याच्या तयारीत तर कोणी (प्रियंका चोपडा) बिझनेस मधे नाव कमावून स्वः अजूनही हरवलेलाच, सुखाचं आयुष्यही शोषिता प्रमाणे जगणारी (शेफाली शहा), स्वः शोधावा अशी वेळच न आलेला (रणवीर सिंग), पुरोगामी असण्याची झूल मिरवणारा जावई (राहूल बोस), प्रक्टिकल (फरहान अख्तर), अजून एक प्रक्टिकल (अनुश्का शर्मा) ह्या सगळ्यांचा जीवनाचा कोलाज व्यवस्थितपणे आपल्या समोर येतो.
हिन्दी सिनेमा वेगळ्या वळणावर जाऊ पहातोय त्यांची एक (पुसटशी का होईना) झलक ह्यात दिसते. आता पर्यंत हिरो हिरोईन यांची प्रेम प्रकरणं, त्रिकोण - चौकोण नुकतिच कुठे याची पुढची पायरी म्हणून लग्नानंतरचं आयुष्य इथवर गाडी आलेली तर ह्यात ती अजून पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे.
संपूर्ण पणे पांढर किंवा काळं असं काही नसतं ना आयुष्य... प्रत्येकांत ग्रे शेड्स असतातच ना... ह्या ग्रे शेड्स खुबीने दाखवण्याचं काम बर्याचदा लो बजेट आर्ट फिल्मस् उत्तम करतात. तेच इथे भव्य दिव्य पणे पूर्ण कर्मशियल सिनेमा करु पाहतो, पण ही रियालिटी नि रियल माणसं काही ह्या कर्मशियल सिनेमाला झेपत नाहीत. शेवटाकडे जाता जाता सगळंच कसं फिल्मी होऊन जातं. संगीत काही जमलं नाही एकही गाणं थियेटर मधून बाहेर पडल्यावर लक्षात राहत नाही. सिनेमॅटोग्राफी ही यथा तथाच. आर्ट/कर्मशियल मिश्रण काही एकजीव होत नाही रिमा काग्ती नि झोया अख्तर द्वयीकडून जे अपेक्षीत असं होतं ते काही गवसतं नाही. एवढं भव्य क्रू़झ नि त्यातून विदेश पर्यटन पण कुठेच ती भव्यता टिपली गेली नाही. ज्या व्यक्तिरेखा अस्सल म्हणून बारकाव्यांसहित सुरवातीला उभ्या राहतात... क्षणात फिल्मी पध्दतीने वागू लागतात. ना धड हे ना धड ते.
त्यातूनही काही सीन्स् अगदी जमून आलेत, नाविन्य ही आहेच थोड्सं. अभिनयात तर चढाओढच... त्यातूनही लक्षात राहते प्रियंका... (आयेशा मेहरा) मूलगी असण्याचं मोल प्रत्येक ट्प्प्यावर चुकवणारी त्यातून आलेला समंजसपणा... परिस्थितीशरण राहणं ते तो बुजरेपणा झट्कून स्वतःहा साठी जगणं ह्यात अचानक नि तीव्र बदल न होता तो ज्या हळुवार पणे भुतकाळाशी सुसंगत होतो ... हे अगदी उत्तम साकारलं आहे.
एकूणच भारतीय समाजाचं दुट्प्पीपण व्यवस्थित पणे समोर येतं सिनेमातून. एकदा पहावाचं जरुर... टिकावू नाही आहे पण टाकावू ही नक्कीच नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा